घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं शहाणपण नाही,- उपमुख्यमंत्री अजित पवार

शबनम न्यूज : २१ मे ( मुंबई ) – : महाराष्ट्र सरकार कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव थांबविण्यास अपयशी ठरले आहे असे सांगत भाजप २२ मे ला अनोलन करणार या पार्शवभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र सर्व आव्हानांवर मात करुन ही लढाई आपण नक्की जिंकूच,” असा विश्वास व्यक्त केला आहे तसेच “स्वत: च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत आहे. त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त कोरोना योध्दांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची एकजुटीनं लढाई लढत असताना अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल,” असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला .
…..