भारतरत्न’ स्व. राजीव गांधी भारतातील संगणक क्रांतीचे जनक ; आजचा ‘डिजिटल इंडिया’ त्यांनीच रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा – अजित पवार
शबनम न्यूज : २१ मे (mumbai ) – : माजी पंतप्रधान आणि ‘भारतरत्न’ स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! ते भारतातील संगणक क्रांतीचे जनक आहेत. देशानं माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेल्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ त्यांनीच रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत स्वर्गीय राजीव गांधी यांना आदरांजली दिली .स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतींना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले की राजीव गांधी यांच्यासारखा युवा पंतप्रधान देशाला लाभल्याने युवकांच्या हिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले गेले देशात संगणक युग सुरू करण्याचे श्रेय राजीव गांधींना आहे आज कोरोना संकटात अनेक जण वर्क फ्रॉम होम करताहेत विसी द्वारे संवाद साधत आहे हेदेखील राजीव गांधी यांनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयामुळे शक्य झाले आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
….
……