जेवणावरून झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू
शबनम न्युज : – दि.१२ पंढरपूर : तालुक्यातील पळशी येथे ‘घरी जेवायला का आला नाही’ या कारणावरून वाघमारे आणि मोरे कुंटुबीयात भांडण झाले. या भांडणामधे सोमनाथ मोरे हा मृत्युमुखी पडला आहे. याबबात दत्तात्रय मोरे यांच्या फिर्यादीवरून पाचजणांविरुध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामधील तीनजणांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी दिली आहे.
तालुक्यातील पळशी या गावामधे सोमवारी रात्री दिगंबर वाघमारे हे वसंत मोरे यांच्या वस्तीजवळ गेले. मोरे यांच्याच घरासमोर उभे राहून वाघमारे यांनी ‘आमच्या घरी जेवायला का आला नाही’ या कारणावरून मोरे यांना शिवीगाळ सुरू केली. मोठा आरडाओरडा देखील केला. यावेळी मोरे यांचे बंधू तसेच त्यांचे पुतणे, चुलत्या हे बाहेर आल्या. यावेळीच दिगंबर वाघमारे यांनी आपले बंधू हरिदास वाघमारे, नारायण वाघमारे, श्रीधर वाघमारे आणि सचिन वाघमारे यांना बोलावून घेतले. यात बाचाबाची झाली. यावेळी नारायण वाघमारे यांने वसंत आणि दत्तात्रय यांना मारहाण केली.
तसेच ही भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या महिलांनादेखील मारहाण करण्यात आली. या वेळी सोमनाथ मोरे हे ‘महिलांवर हात कशाला उगारता ’ असे म्हणत या भांडणात आले. त्यावेळी दिगंबर वाघमारे यांनी सोमनाथ यांचा गळा दाबून त्यांना भिंतीकडे ढकले. यामधे सोमनाथ हे बेशुध्द झाले. यानंतर सोमनाथ यांना भाळवणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले. भाळवणीतून पंढरपूरकडे उपजिल्हा रुग्णालयातदेखील दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच सोमनाथ मोरे हे मृत पावले होते.